मुंबई – बॉलिवूडचं सर्वात प्रतिष्ठित घराणं पैकी एक बच्चन कुटुंबाकडे पाहिले जाते. बच्चन कुटुंबाने बॉलिवूडमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. ८० – ९० दशकात अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूड गाजवले. अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन या देखील बॉलिवूड मध्ये ८० – ९० दशकात अभिनेत्री म्ह्णून काम केलं. त्यानंतर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन हा सुद्धा बॉलिवूडमध्ये काम करतो. अभिषेकची पत्नी ऐश्वर्या रॉय ही सुद्धा बॉलिवूड इंडस्ट्रीमधली सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुद्धा आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबाच्या प्रत्येक गोष्ट त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायची असते. पण गेले कित्येक दिवस झाले बच्चन कुटुंबात काही सुरळीत नसल्याचं चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या आहेत. पहिला ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चनचा घटस्फोट झाला असल्याच्या रंगल्या होत्या. त्यानंतर ऐश्वर्या रॉय हिने बच्चन कुटुंबियांचं घर सोडले असल्याचा सुरु होत्या. अशातच अभिषेकच्या एका गोष्टीने या चर्चाना जोर आला आहे

काय झालं असं..?

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा 51 वाढदिवस 3 जून रोजी झाला. दरवेळी अमिताभ बच्चन हे लग्नाच्या वाढदिवसाला खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र, यंदा त्यांनी कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. हेच नाही तर नेहमी लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी घरी पार्टी ठेवली जाते. मात्र, यावेळी अशाप्रकारची कोणती पार्टी झाली नसल्याचे देखील माहिती समोर आली आहे . अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून शुभेच्छा देखील दिल्या.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा वाढदिवस असतानाही अभिषेक बच्चन याने सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची पोस्ट शेअर केली नाही. दरवेळी अभिषेक बच्चन सोशल मीडियावर पोस्ट करत आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मात्र, यावेळी अभिषेक बच्चन याने पोस्ट शेअर केली नसल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यामुळे त्याचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. बच्चन कुटुंबात सर्व काही सुरळीत आहे का..? असा सवाल त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.