मुबई : मराठा आरक्षण आणि ओबीसींचे आरक्षण बचाव आंदोलनाने महाराष्ट्रातील वातावरण चिघलळे आहे. एकीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी लावून धरली आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाज ही आक्रमक झाला असून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केला आहे. यातच मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सरकारला काही दिवसांचा अवधि दिला आहे. आता पुन्हा जरांगे यांनी शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी यासह 13 जुलैपूर्वी मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यावं, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
दरम्यान, उओषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना जरांगे यांनी सरकारकडे केलेल्या मागण्यांबद्दल माहिती दिली. तसेच राज्य सरकारवर प्रत्येक वेळा शंका घ्यावी अशी स्थिती नाही. कॅबिनेट बैठक का रद्द झाली माहिती नाही. मात्र, आमच्या मागण्या सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी, सगळे गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया, मराठा कुणबी एकच आहेत, याबाबतचा कायदा 57 लाखांच्या नोंदींच्या आधारे करण्यात यावा. शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी यासह 13 जुलैपूर्वी मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यावं, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
तसेच ओबीसी समाज ही आरक्षणासाठी लढत आहे. यावर अप्रत्यक्षरीत्या बोलताना, आरक्षण असून ते इतके लढत आहेत, आम्हाला आरक्षण नाही आम्ही किती लढू, असं मनोज जरांगे म्हणाले. आरक्षण असणारे लोक असं लढत आहेत तर आरक्षण नाहीत ते चौपट ताकद लावून लढतील, असं मनोज जरांगे म्हणाले. महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातील, सगळ्या संघटनेतील कामगार, माथाडी कामगार, बैलगाड्या हाणणारे, ट्रॅक्टर हाणणारे, टेम्पो, रिक्षा चालवणारे एक होतील. आम्हाला आरक्षण नाही ते मिळावं म्हणून ताकदीनं लढणार आहे. मतभेद सोडून मराठा समाजाचे लोक मुलांसाठी लढणार आहेत, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
जे मराठ्यांना मदत करणार नाहीत. कुठल्याही पक्षाचे आमदार, खासदार असतील त्यांना उघडं पाडणार आहे. त्यांनी मराठ्यांच्या पोरांच्या बाजूनं उभं राहावं, असं मोज जरांगे म्हणाले. आम्हाला उपोषणाला शांतपणे बसलो होतो तेव्हा मोर्चे काढले जात होते, असं मनोज जरांगे म्हणाले. आम्हाला आरक्षण नाही म्हटल्यावर महाराष्ट्रातील घराघरातील मराठ्यांनी एकत्र यावं, असं मनोज जरांगे म्हणाले.
छगन भुजबळ आंदोलनात कधी नव्हते. मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी छगन भुजबळ यांनी कायम केलं आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. गावगड्यातील ओबीसी बांधवांना देखील मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, असं वाटत असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं.



