कुरुंदवाड (प्रतिनिधी) : गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शिरढोण- कुरुंदवाड दरम्यानच्या शिरढोण पुलावर आज (रविवार) सकाळी पाणी आले. त्यामुळे शिरढोण-कुरुंदवाड संपर्क तुटला आहे. त्यामुळे शिरढोण ग्रामपंचायत प्रशासनाने बॅरिकेट लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.

तर शिरढोण नांदणी रस्त्यावर ओढ्याचे पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दरम्यान, पुराचे पाणी पुलावरून दोन फुटांनी वाहत असून पाण्याची वाढ संथगतीने सुरू आहे. तसेच पुराच्या पाण्याला गती असल्याने कुरुंदवाड पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बँरेकेटस लावून वाहतुकीसाठी रस्ता बंद केला आहे. तर ग्रामपंचायतीचे कर्मचारी पुलाच्या रस्त्यावर गस्त घालीत आहेत.