मुंबई – सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार नाहीत अशी चर्चा होत आहे. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे अजित पवारांनी यांच्या आधी देखील बारामतीतून निवडणूक लढवली होती. पण अजित पवार यांच्या ऐवजी आता त्यांचे पुत्र जय पवार बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची देखील चर्चा होत आहे.
शरद पवार गटाकडून बारामतीतून युगेंद्र पवार यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर अजित पवार यांच्या जागेवर जय पवार यांनी विधानसभेची निवडणूक लढली तर नवी राजकीय समिकरणं समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा बारामतीत युगेंद्र पवार विरूद्ध जय पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे.याआधी देखील लोकसभा निवडणुकीदरम्यान अजित पवारांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उतरवले होते. पण बारामतीतून लोकसभा निवडणूक सुप्रिया सुळे या वीज़यी झाल्या होत्या. आत पून्हा तेच समीकरण करणार असल्याचं बोललं जात आहे शरद पवार गटाकडून बारामतीतून युगेंद्र पवार यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर अजित पवार यांच्या जागेवर जय पवार यांनी विधानसभेची निवडणूक लढवतील असे बोललं जात आहे
अजित पवार काय म्हणाले होते?
लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांनी जाहीर भाषणात एक विधान केलं होतं. अजित पवार यांचं हेच भाषण सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.अजित पवारांनी भाषणात म्हणलं होत कि जर तुम्ही सुनेत्रा पवारांना निवडून दिल तर मी बारामतीतून विधानसभा निवडणुकीला उभं राहीन. नाती तर तुम्ही जर मला साथच देणार नसाल तर मला माझा संसार आहे. मी निवडणूक लढणार नाही, असं अजित पवार या सभेत म्हणाले होते. त्यांचं हे भाषण सध्या व्हायरल होत आहे.त्यामुळे अजित पवार यंदाची विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचं बोललं जात आहे.या भाषणातील अजित पवारांचं वक्तव्य पाहता अजित पवार आता बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार नसल्याची चर्चा होत आहे.
समर्थकांचं म्हणणं काय?
बारामतीत राष्ट्रवादीच्या जन सम्मान रॅलीत उपस्थित असणाऱ्या लोकांच्या आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तर अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत, ही केवळ चर्चा आहे. यात कोणतंही तथ्य नाही. बारामती म्हणजे अजित पवार अशी ओळख आहे. त्यामुळे अजित दादा असा निर्णय घेणार नाहीत आणि त्यांनी तसा निर्णय घेऊही नये, असं अजित पवार यांच्या समर्थकांनी म्हटलं आहे.